क्लिक करा

Hartalika Vrat

हरितालिका व्रत

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. त्यापैकी हरितालिका व्रत हे कुमारिका व विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. कुमारिका मुलींनी मनासारखा पती मिळावा म्हणून, तसेच विवाहित स्त्रियांनी अखंड सौभाग्य, आरोग्य व समृद्धीसाठी हे व्रत करण्याची परंपरा आहे.

संकल्प
व्रताच्या प्रारंभी खालील मंत्राने संकल्प केला जातो –
“उमामहेश्वरसायुज्य सिद्धये हरितालिका व्रतमहं करिष्ये॥”

व्रत व पूजा
या दिवशी नदी अथवा समुद्रातून वाळू आणून तिच्यापासून पार्वती, गणपती व शिवलिंगांच्या प्रतिमा तयार केल्या जातात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते.
या व्रतात अग्निज अन्न ग्रहण केले जात नाही, केवळ फलाहार केला जातो.
रात्री कथा ऐकणे व जागरण करण्याची प्रथा आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून देवीला खिचडीचा नैवेद्य दाखवून तिचे विसर्जन केले जाते.

व्रताचे महत्त्व
श्रद्धा व भक्तीने हे व्रत केल्यास:
कुमारिकांना मनासारखा पती प्राप्त होतो
विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती व संपत्तीची प्राप्ती होते

हरितालिका हे नाव का पडले?
‘हरित’ म्हणजे हरण करणे आणि ‘आलिका’ म्हणजे सखी
देवी पार्वतीला तिच्या पित्याच्या घरातून दूर नेण्यासाठी तिच्या सखीने मदत केली व तिला घनदाट जंगलात नेले. यामुळे पार्वतीला ‘हरितालिका’ हे नाव प्राप्त झाले.

पार्वतीची कथा
पर्वतराज हिमालयाची कन्या गौरीला ‘पार्वती’ असे म्हणतात.
एकदा नारदमुनी भगवान विष्णूचा विवाह प्रस्ताव घेऊन हिमालयाकडे आले. हिमालय प्रसन्न झाले, पण पार्वतीने मनोमन शिवालाच आपला पती मानले होते.

पित्याने विष्णूशी लग्न निश्चित केल्याचे कळल्यावर पार्वतीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या केली. शिवाच्या अखंड चिंतनाने त्यांनी शंकराला प्रसन्न केले. शिवाने तिची मनोकामना पूर्ण केली व विवाहास संमती दिली. नंतर हिमालयाने मोठ्या थाटामाटात शिव-पार्वतीचा विवाह लावून दिला.

यातून पार्वतीच्या प्रेम, निष्ठा आणि तपश्चर्येच्या बळावर तिने शंकरास पती म्हणून प्राप्त केले. त्यामुळे शंकरास ‘पार्वतीपतये’ म्हटले जाऊ लागले.

आजच्या काळातील संदेश
आजच्या मुलींनी व त्यांच्या पालकांनी या व्रतातून महत्त्वाचा संदेश घ्यावा.
लग्न करताना फक्त संपत्ती, ऐश्वर्य किंवा बाह्य देखावा पाहू नये. त्याऐवजी मुलाचे गुण, कर्तृत्व, चारित्र्य आणि सद्गुण यांचा विचार करावा.
ऐश्वर्य कधीही नष्ट होऊ शकते, पण सद्गुण आयुष्यभर टिकतात. हाच हरितालिका व्रताचा खरा संदेश आहे.

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

🕉️ ब्रह्मतेज – मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे
📞 संपर्क करा: +91 97697 49253

संचालिका: सौ. आर्या जोशी
(Astrologer – Vastu Expert | Scientific Spiritual Expert)

  • Hartalika Teej Puja Navi Mumbai

  • Hartalika Vrat 2025 Panvel

  • Best pandit for Hartalika Puja in Navi Mumbai

  • Online Hartalika Vrat Puja booking

  • Hartalika Vrat Vidhi Navi Mumbai

  • Hartalika Teej Katha & Puja Panvel

  • Guruji for Hartalika Teej Puja Navi Mumbai

  • Astrology & Puja services Navi Mumbai Panvel

  • Hindu festival puja services near me Navi Mumbai

  • Bramhatej astrology & puja services Panvel

#HartalikaVrat #HartalikaTeej #HartalikaVrat2025
#NaviMumbaiAstrologer #PanvelAstrology #NaviMumbaiPuja
#PanvelPandit #NaviMumbaiPandit #OnlinePujaBooking
#HinduFestival #VratVidhi #IndianTradition
#AstrologyServices #PujaServicesNaviMumbai #SpiritualNaviMumbai

Comments are closed